प्रादेशिक हवामान विभाग, मुबंई द्वारे देण्यात आलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यांमध्ये 18 ते 20 मे दरम्यान काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह (40-50 किमी प्रतितास वेग) मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 🔴 दि. 21 ते 25 मे दरम्यान मात्र अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत असल्याने संपूर्ण कोंकणसह पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अपेक्षित परिणाम:
*जोरदार पावसामुळे शहरी भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
*जुन्या आणि कमकुवत इमारतीची पतझड होवू शकते.
*शेतीतील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता.
*विजांच्या घटनेमुळे वस्तू व जीवित हानी होवू शकते.
कृषि सल्ला
*उन्हाळी भात, भुईमूग, परिपक्व फळे व भाजीपालाचे नुकसान होवू नये म्हणून लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. *नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना मातीची भर द्यावे व काठीचा आधार देवून दोरीने बंधावे. जनावरांचा चारा सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करा व जनावरांचे शेड कमकुवत असेल तर डागडुजी करून घ्यावी जेणेकरून नुकसान होणार नाही. अशी माहिती जिल्हा कृषि हवामान केंद्र कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड यांच्याकडून देण्यात आली आहे.